एसटी पास: शाळेत थेट सवलत

एसटी पास: शाळेत थेट सवलत!

एसटी पास: शाळेत थेट सवलत!

आता आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस पास मिळवण्याची प्रक्रिया कशी सोपी केली आहे, पाहू. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) घेतलेल्या निर्णयानुसार, विद्यार्थ्यांना आता बस स्थानकावर किंवा आगारामध्ये न जाता, थेट त्यांच्या शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये पास उपलब्ध होतील. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्यांना पास मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी होणार आहे. तथापि, ग्रामीण भागातील बस फेऱ्यांची कमी संख्या आणि बसेसच्या तुटवड्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवरही आपण प्रकाश टाकणार आहोत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणि इतर प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो.
नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आजच्या या खास लेखात, तर सुरु करुया , मित्रांनो "एसटी ची पास थेट तुमच्या शाळेत" अशा पद्धतीच्या बातम्या कालपासून तुम्ही माध्यमांमध्ये ऐकलेल्या असतील, आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागातील शेतकरी असू द्यात, विद्यार्थी असू द्यात ,नोकरदार असू द्यात यांना शहरांमध्ये जायचं असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा बाजार जिथे भरतो गावापासून जवळच्या एखादं निम्न शहरी भाग जो असेल तिथे जर का जायचं असेल तर शेतकऱ्यांची असेल विद्यार्थ्यांची असेल नोकरदारांची असेल पहिली पसंती ही एसटी म्हणजेच ज्याला आपण लाडान "लाल परी" अस सुद्धा म्हणतो ती असते आणि ग्रामीण भागातल दळणवळण जे काही आहे त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका या एसटी ची आहे. आता याच संदर्भात विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आता 16 जून पासून शाळा ह्या सुरू होणार आहेत म्हणजेच आजपासूनच सुरू झालेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवरती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे आणि ती घोषणा आहे "एसटीचा पास थेट शाळेत" आता या घोषणेचा अर्थ नेमका काय याच्यामध्ये काय नेमके बदल करण्यात आलेले आहेत आणि काय फायदे आहेत याचीच माहिती आपण आज सोप्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर तुम्ही बऱ्याचदा ही बातमी तुमच्या मोबाईलवरती पाहिलेली असेल या बातमीचा नेमका अर्थ काय तर आता जे काही ग्रामीण भागातन शहराला शिकायला जे काही विद्यार्थी जातात त्यांच्यासाठी जे काही दैनंदिन पासेस असतात त्या पासेस मध्ये 66.66 टक्के इतकी जी काही रक्कम आहे ती राज्य सरकार कडून भरली जाते म्हणजे त्याच्यामध्ये सवलत दिली जाते आणि 33 पूर्णांक 33 टक्के ही पास ची जी काही फी आहे ती विद्यार्थ्यांना भरावी लागते परंतु आता या पद्धतीचे हे गणित असलं तरी पास ची नोंदणी करण्यासाठी बहुतांश वेळेस विद्यार्थ्यांना आगार असेल किंवा एसटी स्टॅड असेल आणि तिथे जे काही केंद्र असतं तिथे जाऊन बराच वेळ उभं राहाव लागायचं त्यामध्ये लांबच लांब रांगा त्यात शाळेचे दिवस सुरू झाले की आपल्याला पाहायला मिळायच्या पण आता त्यावरतीच उपाय म्हणून विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा विद्यार्थ्यांना हे जे काही हेल्पटे आहेत आगाराचे असतील किंवा त्या पास सेंटरचे जे असतील म्हणजे केंद्राचे जे असतील ते हेल्पटे विद्यार्थ्यांचे वाचावेत म्हणून परिवहन मंत्र्यांनी या पद्धतीचा हा निर्णय घेतलेला आहे की तुमच्या शाळेतच आता हा पास विद्यार्थ्यांना मिळणार आहे आता दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे की विद्यार्थ्यांना जर का शाळा आणि महाविद्यालयातच जर काही हे पास उपलब्ध करून दिले जाणार असतील तर त्याची प्रक्रिया काहीतरी एक ठरवलेली असेल तर या संदर्भात आत्ता काही माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात येत की शाळा आणि महाविद्यालयाकडून आगार असेल किंवा बस स्थानक असेल तिथले जे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना जी काही यादी पुरवली जाईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हे पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर या पद्धतीची ही प्रक्रिया असेल त्याच पुढचं जे काही अपडेट असेल ते आपण पुढच्या काळात घेणारच आहोत पण आता 16 जून पासून ही मोहीम परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतर राज्यभरात राबवली जाणार आहे आणि आता विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी आगार किंवा बस स्थानकात जाण्याची गरज पडणार नाही त्यांना त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयामध्येच जे काही पासेस आहेत ते शाळा आणि महाविद्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची सगळ्यात मोठी यंत्रणा ही जर का एसटी वरती अवलंबून असली तरी त्याच्या फेऱ्या ज्या आहेत एसटीच्या आणि एसटीची संख्या जी आहे बसेसची ती कमी असल्यानं ग्रामीण भागात जी काही दळणवळणाची व्यवस्था आहे ती पूर्ण पद्धतीने म्हणजे पूर्ण कार्यक्षमतेन आपल्याला अमलात आली असं दिसत नाही आणि त्यामुळे शेतकरी असतील किंवा विद्यार्थी असतील ग्रामीण भागातले रहिवासी असतील यांची एक मागणी असते की बसेसच्या संख्या सुद्धा ही वाढवली पाहिजे कारण की ज्यावेळेस शाळा महाविद्यालय सुरू होतात त्यावेळेस ग्रामीण भागातन शाळेत महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते आणि दुसरीकडे नागरिकांची येजा करण्याची संख्याही मोठी असते त्यामुळे बहुतांश वेळेस तर बसेसची संख्या कमी असल्यामुळे एकाच बसमध्ये दाटीवाटीने गर्दी करून अशा पद्धतीचा प्रवास हा विद्यार्थ्यांना करावा लागतो बऱ्याचदा तर उभं राहून सुद्धा प्रवास करावा लागतो त्यामुळे राज्य सरकार एकीकडे विद्यार्थ्यांची काळजी घेऊन त्यांच्या शाळेतच आणि महाविद्यालयात पासेस उपलब्ध करून देत पण दुसरीकडे ग्रामीण भागातील ज्या काही बसेस आहेत एसटीच्या म्हणजे महामंडळाच्या त्या कमी होतायत दिवसेंदिवस आणि त्याच्या फेऱ्याही कमी होतात त्यामुळे बऱ्याचदा तर असं होतं की वाडी वस्तीवरती महामंडळाच्या बसेस जात नाहीत आणि त्या भागात रस्ते नसतात अन्य अडचणी असतात आणि मग त्या भागातील विद्यार्थ्यांना पाईपीठ करत करत तीन चार किलोमीटर चालत जाव लागत आणि तिथून एखाद्या फाट्यावरन वगैरे बस मिळते परंतु त्या बसची जर का वेळ मागेपुढे झाली थोडीफार किंवा विद्यार्थ्याला मागेपुढे पाच दहा मिनिट लेट झालं तर बसेस सुद्धा हातात न जातात आणि अशा वेळेस शाळा किंवा महाविद्यालयाला विद्यार्थ्यांची दांडी सुद्धा पडते तर एकूण प्रश्न हा परिवहन मंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलाय की विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच आणि महाविद्यालयात पासेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत परंतु बस आणि एकूणच दळणवळणाची व्यवस्था जी काही आहे ग्रामीण भागातली ती सुद्धा सुधारली पाहिजे जेणेकरून विद्यार्थी नागरिक असतील शेतकरी असतील नोकरदार असतील यांनाही त्याचा फायदा घेता येईल अशी सुद्धा मागणी ग्रामीण भागातले नागरिक हे करत असतात तर या पद्धतीचे एक अपडेट होतं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आणी विद्यार्थ्यांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर नक्की करा .

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डिजिटल सातबारा: ऑनलाईन माहिती आणि उपयोग

पीएम किसान: ३० हजार रुपये निधीचा प्रस्ताव